यशाचा पासवर्ड : मनशक्ती
जो मन जिंकतो...तोच रण जिंकतो
1) तुम्ही मनाने दुर्बल आहात का ?
माणसं शरीरबळ Bodybuilding वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात.मात्र 'मन' बळ Mind Power वाढविण्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. उत्तम मनोबल हे कर्तृत्वप्रांती यशस्वी होण्याचा सर्वोत्तम गमक आहे.
2) जय-पराजय या गोष्टी फार नंतरच्या , पण पहिल्यांदा रणात तर उतरा !
एका वर्तमानपत्रात एक जाहिरात आली, उत्तम ड्रायव्हर Driver हवा आहे. ज्याने एकदाही अपघात केला नाही ! मुलाखतीला अनेकजण आले.पण प्रत्येकाकडून कुठेतरी, कधीतरी छोटासा का होईन, पण अपघात झाला होताच. पण एकजण सापडला जो छाती ठोकून सांगत होता, गेल्या २५ वर्षात माझ्या हातून एकही अपघात झाला नाही !
त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं. कागदपत्र... पुरावे त्याच्या विनाअपघाताची साक्ष देत होते. पण मुलाखत कर्त्याला राहवलं नाही. त्याने विचारलं, ' गेल्या २५ वर्षात तुमच्याहातून एकही अपघात झाला नाही, या यशाचं रहस्य काय ?' समोरचा शांतपणे उत्तरला, 'गेल्या २५ वर्षात माझी गाडी मी ग्यारेजच्या बाहेर काढली नाही !' खरं आहे, ज्याचा गाड्या ग्यारेजला असतात, त्यांचा अपघात होण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्यपेखा हेही तितकंच खरं की, त्या गाड्या रस्त्यावर आल्या नाही म्हणजेच त्यांना कधी ध्येय गाठता येणार नाही. जे रस्त्यावर येतील, प्रवासाला सुरुवात करतील, तेच तर ध्येयापर्यंत पोहचू शकतील.
पण मनात नकारात्मक विचाराचे वारे फेर धरून नाचू लागतात आणि माणसाची मन डळमळतात. अशी माणसं पराभवाच्या भीतीने वा जे आहे त्याचाही क्षय होईल, या अतिभयाने पुरती गळाठतात. सरळ जागेवर थांबणंच पसंत करतात. हे थांबणं म्हणजे संपून जाणं ! मग संपूणच जायचं आहे, तर गंजून का वाया जायचं ? त्यापेक्षा काही करत झिजून जाऊ या ना...!
समाजातील दुर्योधन Duryodhan प्रवृत्ती संपवण्यासाठी अशी अर्जुनमनं उभी करावीच लागतील. काही करती... धडपडती... लढती मनं घडवणं, ही समाज आणि राष्ट्र घडवन्यातील महत्वाची गरज आहे. मनं तयार करणं, हे राष्ट्र तयार करणंच आहे. कारण कुठलीही गोष्ट एकदा नाही, तर दोनदा तयार होते. मी लिहितोय तो पेन एकदा नाही, तर दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाऱ्याच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात !
देशाला महासत्ता बनवायचं आहे ना, मग देश पहिल्यांदा मनात महासत्ता व्हावा लागेल. तर तो प्रत्यक्षात येईल ! शिवरायांनी Shivaji Maharaj स्वराज्य पहिल्यांदा मावळ्यांच्या मनात उभं केलं आणि मनातलं हे स्वराज्य Swarajya मावळ्यांनी प्रत्यक्षात आणलं.
मनोबलाअभावी हत्तीचं बळ असणारी माणसंही खचतात आणि मुंगीबळाची माणसंही मनोबळाच्या जोरावर बलाढ्यावर बाजी मारून जातात, इतिहास घडवतात.म्हणूनच उभ्या आयुष्यात एकदाही लढाई न केलेले वर्धमान ' महावीर ' झाले. कारण त्यांनी 'मन' जिंकलं होतं. आणि जो मन जिंकतो तो रण जिंकतोच ! नुसता वीरच नव्हे तो महावीर ठरतो.
उत्तम शरीरबळ असणारी माणसंही जेव्हा आत्महत्येचा मार्ग पत्करतात, तेव्हा आजच्या सिक्स प्याकच्या जमान्यात मनोबल वाढवण्याचा, मन जिंकण्याच्या महावीरांच्या मार्गाची नितांत आवश्यक वाटते. चला सुरुवात करूया !!
खूप छान ..!अलीकडच्या काळात होत असणाऱ्या आत्महत्या विचार करण्याची गोष्ट आहे,,मग त्या IAS अधिकारी असो,राष्ट्रसंत असो अथवा कोणी फिल्मस्टार असो,या सगळ्यावर प्रभावी भाष्य आणि मनाची मजबूत व्यायामशाळा भरवणारा लेख
उत्तर द्याहटवाखूपच छान सर ..तुम्ही अगदी खर सांगितले.. मी पण लीहणार या वरती छोटासा लेख ..तुम्ही मला एक दिशा दाखवली सर..
उत्तर द्याहटवासर तुमच्या भाषनातुन जगण्याची एक प्रकारची ऊर्जा माझ्या मनात तयार झाली आपला आभारी आहे
उत्तर द्याहटवाउपयुक्त लेख
उत्तर द्याहटवातुमच्या विचारानेच अभ्यासाची गोडी निर्माण होती. छोटे छोटे लिखाण करण्याची आवड निर्माण होते आणि
उत्तर द्याहटवातुम्ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा आदर्श पैकी एक आहात
लहान आहे मी त्यामुळे शब्द मांडता येत नाही पण तरिही मनापासून सांगते तुमचा लेख
म्हणजे एक अद्भुत प्रेरणा🙏🙏🙏 खुप खुप आभार सर इथुनच सांष्ठांग नमस्कार
Sir khup chhan hot bhashan...🔥👍🏻🙏🏻
उत्तर द्याहटवा